पुस्तक : माझा मित्र

पुस्तक: माझा मित्र
नमस्कार मित्रांनो,
पुस्तक म्हटले की आपल्याला खुप आनंद होतो. पुस्तक आपला मित्र असतो. तो आपली एखाद्या सख्याप्रमाणे सोबत करत असतो, विविधांगी अनुभव देतो, पुस्तक वाचताना आपण लेखकांच्या भावविश्वाशी समरस होतो. विश्वाचा विसर पाडण्याची प्रचंड क्षमता पुस्तकात असते. सारे विश्व आपल्या विरोधी असतानाही आपण पुस्तकांशी मैत्री करू शकतो. पुस्तक आपला एकटेपणा तर घालवतातच पण त्याच बरोबर एक नवीन शक्तिसंचार, नवीन उत्साह आणि नवीन दिशाही देतात. जीवनात आलेली मरगळ घालवायची असेल तर पुस्तक वाचले पाहिजे, संकटाशी सामना करण्यासाठी मानसिक आणि बौद्धिक तयारी करण्यासाठी सुद्धा पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे. तसेच मनाच्या शांततेसाठी सुद्धा पुस्तक वाचले पाहिजे.ज्यांना ज्ञान कण वेचायचे आहेत त्यांनी तर पुस्तक वाचले पाहिजेच पण ज्यांना काही लिहायचे, व्यक्त व्हायचे, मांडायचे त्यांनी तर पुस्तक वाचलेच पाहिजे. पुस्तक तुमचे अनुभवविश्व समृद्ध करते. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे " सर्वच अनुभव स्वतः च्या जीवनात घेण्याएव्हढे आपले आयुष्य मोठे नसते, म्हणून आपण इतरांच्या अनुभवावरून पण शिकले पाहिजे..!" प्रत्येक पुस्तक एक अनुभव असतो. तो अनुभव घेण्यासाठी त्या व्यक्तीने सारे आयुष्य खर्ची घातलेले असते. तोच अनुभव एक किंवा दोन दिवसात घ्यायचा असेल तर पुस्तक वाचण्यासारखा सोपा उपाय दुसरा कुठलाही नाही. एकूण काय की माणसाला जगण्यासाठी सुद्धा पुस्तक वाचले पाहिजे म्हणूनच "वाचाल तर वाचाल" असे म्हटले असावे.
राजेश खाकरे

6 comments:

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...