अस्तित्व...



अस्तित्व

ओल्या शेतात धान्याची पेरणी करताना
हुरडा झालेल्या कणसाची कापणी करताना
मातीमोल भावाने पिकाची विक्री बघताना
हातावर उमटलेल्या प्रत्येक चरबटावर
शेतकरी शोधत राहतो स्वतः चं अस्तित्व दरवर्षी...

या भल्यामोठ्या जगात वावरतांना
मान-अपमान खाचखळगे पचवतांता
सुख-दुःखाची गोळाबेरीज करतांना
उगवणाऱ्या सूर्याच्या प्रत्येक किरणांवर
माणूस शोधत राहतो स्वतः चे अस्तित्व दरदिवशी

आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन सर्वांसमोर मांडताना
पद प्रतिष्ठा पैसा यात गुरफटून जात असतांना
दुसरीकडे गरीब पोटाची टीचभर खळगी भरतांना
शर्टावरील ठिगळात शोधत राहतो
त्याच्या मुलाच्या भविष्याचे अस्तित्व दरवेळी

प्रत्येकजण लढतोय स्वतःच्या अस्तित्वाची लढाई
मोठा, श्रेष्ठ , पैसेवाला बनण्यासाठी चालू आहे चढाई
विश्वास-अविश्वास, प्रेम-द्वेषाच्या बहुरंगी वातावरणात
मी शोधत राहतो माणुसकीचे अस्तित्व सभोवताली प्रत्येकवेळी
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

बालकविता : पशु-पक्षांचे संमेलन



बालकविता : पशु-पक्षांचे संमेलन

पशु आणि पक्षांचे संमेलन जंगलात भरले
कोल्होबाने कष्ट घेऊन आयोजन त्याचे केले

जंगलाचे राजे सिंहोबा अध्यक्षस्थानी बसले
पांढरीशुभ्र खादी घालून बगळोबा आले
खारु ताई, माकडदादा,ससेराव ही आले
हळूहळू येता येता कासवराव लेट झाले

कोकिळीने मंजुळ स्वरात गाणे मधुर गायले
मोरांचे नाचणं बघून सारे मंत्रमुग्ध झाले
पोपटाने थट्टामस्करीत मिमिक्री जरा केली
हत्तीने मग साहित्यावर गंभीर चर्चा केली

खारुताईने योगाचे प्रकार करुन दाखवले
माकडदादाने सर्व नुसते पाहणे पसंद केले
बगळोबा चष्मा सावरत स्टेजवरती आले
राजकारणावर ते लांबलचक बोलून गेले

वाघोबाराजे, सिंहोबाचे जोरदार भाषण झाले
जंगलावर माणसाचे आक्रमण होतेय म्हणाले
कावळोबाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
शेवटी जेवणावर सर्व मनसोक्त तुटून पडले
©  राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com


फक्त एकच प्रॉब्लेम आहे...


फक्त एकच प्रॉब्लेम आहे...

        या जगातील गमतीची गोष्ट काय आहे माहितेका....या जगातल्या प्रत्येकाला एक प्रॉब्लेम आहे, जो त्याला दुःखी करत असतो....तुम्हाला कधी वेळ मिळाला ना तर एक काम नक्की करा ज्याला तुम्ही सुखी मानता ना त्याला जाऊन भेटा, चांगल्या तासभर गप्पा मारा, बोलता बोलता तो म्हणेल, "काय सांगू तुम्हाला, सर्व व्यवस्थित आहे हो देवाच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने, पण फक्त "हा" एक प्रॉब्लेम आहे नाहीतर, माझ्यासारखा सुखी कोणी या जगात नसता"
         आणि मग त्या प्रॉब्लेम चे चांगले लांबलचक रडगाणे तुमच्यासमोर गाणार.. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला भेटा त्याला एक असा प्रॉब्लेम नक्की आहे जो त्याला सुखाने जगू देत नाही, आता ह्या प्रॉब्लेम ची काही ठराविक साईज नाही मात्र तो मोठा प्रॉब्लेम आहे असेच प्रत्येकाला वाटत असते, कुणाला कशाचा प्रॉब्लेम असेल याचाही काही नेम नाही, कुणाला पैसे नाही हा प्रॉब्लेम असेल तर कुणाला पैसे कसे सांभाळायचे हा प्रॉब्लेम असेल, कुणाला मुलगा नाही हा प्रॉब्लेम आहे तर कुणाला जास्त आहेत हा प्रॉब्लेम, कुणाची एखादी इच्छा सफळ संपूर्ण होत नाही म्हणून दुःखी असेल, तर कुणी कशामुळे.
         मला तर हा भगवंत मोठा कलाकार वाटतो, तो आमची गंमत कुठे तरी गुपचूप बसून बघत असावा, की बघू आता हा काय करतो, कधी तर असं वाटतं की त्या देवाला जणू कुणाला सुखाने जगू द्यायचे नसावे, कारण त्यांनी कुणाच्या बापाला सोडलेले नाही, पैसेवाला सुखी असेल असे समजून आम्ही जेव्हा पैशावाल्यांच्या जीवनाकडे बघतो तर त्यांचे तर वेगळेच प्रॉब्लेम आम्हाला दिसतात , त्यांना अन्न पचवायला रोज फिरत बसावे लागते (हा पण एक मोठा प्रोब्लेमच आहे)
         "मी 100% सुखी आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही" असे छातीठोकपणे म्हणणारा मला तरी अजून कोणी भेटला नाही. म्हणजे प्रत्येक जण आपल्या "गन-गणीत" आहे, आणि हि गनगण (प्रॉब्लेम) काही आयुष्यभर सुटत नाही, कारण एक प्रॉब्लेम सुटला कि दुसरा हजर असतो,
        खरं तर काय आहे, काही प्रॉब्लेम हे मुळात प्रॉब्लेम नसतातच फक्त आपण त्याच्याकडे त्या नजरेने बघायला हवे, प्रॉब्लेम आम्हांला खरं तर मजबूत बनवतो, आम्हांला सशक्त बनवतो, आम्हांला लढायला शिकवतो, आपल्या-परक्याची जाणीव करुन देतो, प्रॉब्लेम मध्ये आम्ही जगाकडे एका       वेगळ्या नजरेने बघायला शिकतो,
       बहुतांशी प्रॉब्लेम, समस्या या मानसिक असतात, प्रॉब्लेम काही आमच्या अंगावर रोड रोलरप्रमाणे धावून येत नाही, तरीही आम्ही घाबरून जातो, खचून जातो, आता काय होईल या विवंचनेत राहतो,
हे जग ज्या ईश्वराने निर्माण केलंय तो काही मूर्ख तर नाहीच, तो प्रॉब्लेम हि आमच्या भल्यासाठीच देत असणार, नाहीतर त्याची आणि आमची काही पुरानी दुष्मनी तर नक्कीच नाही, कुंतीमातेने ईश्वराला म्हटले की "देवा मला दुःख दे, कारण दुःखात मला तुम्ही आठ्वता, मला शक्ती मिळते."
आमच्यात एवढी हिंमत तर नाही तसे काही म्हणायची पण आम्ही दुःखाला, प्रॉब्लेम ला एवढं म्हणू शकतो, की हे दुःखा तू ये, तुझे स्वागत आहे, तू माझ्याकडे आला आहेस याचा अर्थ हाच कि भगवंत नक्कीच माझ्यासाठी काही छान घडवत आहे…!”
     आणि हा दृष्टिकोन ठेऊन आम्ही जर प्रॉब्लेम ला सामोरे गेलो तर प्रॉब्लेम आम्हांला चावणार नाही, आणि मग आम्ही म्हणू शकू, "माझ्या आयुष्यात ही एक प्रॉब्लेम आहे, पण तो प्रॉब्लेम माझे आयुष्य अस्वस्थ करत नाही, प्रॉब्लेम काय आहे माहितेका दुःख आता मला पहिल्यासारखी चावत नाही...!
© राजेश खाकरे
Mo 7875438494
rajesh.khakre@gmail.com

मनाची डायरी - 2


“कितना रोया होंगा उसका दिल”



(काल एका 35-36 वर्षाच्या मुलाने त्याच्या 58-60 वर्षाच्या बापाला अक्षरश: मारहाण करताना बघितले, खूपच वाईट वाटले, )

“कितना रोया होंगा उसका दिल”

कितना रोया होंगा उसका दिल, जब लडके ने हाथ उठाया था,
वही हाथ पकडकर जिसने लडकें को चलना सीखाया था

सहम गयी थी उसकी आँखे, कितना लाचार वह दिख रहा था
क्या बीती होंगी उसके दिलपर, जिसे आसरा उसने माना था

जब उसके ही लडके का थप्पड उसके शरीर पे पड रहा था
रुह से रुह तक मानो उसका सीना काँप रहा था

उसके आंख से निकला आंसू कुछ पुरानी बाते याद आयी
कितने गुनाह रखे थे समेंटकर सोचकर आँखे भर आयी

पाँच साल कि आयु में जब बाप बाजार से आया होंगा
'
मेरे लिये क्या लाये पिताजी' हँसते-खिलते बेटा बोला होंगा

कमजोर ठहरा आज बाप, और बेटा बहुत बडा हुआ
अगनित उपकार भुला पिता के उनका शत्रू बन खडा हुआ 

कुछ रुपये पैसे, कुछ बडापन भले ही कम प्रभो देना
इन्सानियत हम भुले कभी ना, इतनी शक्ती हमे देना
-
राजेश खाकरे
Mo.7875438494

विश्वास....



विश्वास....
       किती छोटा शब्द ना... जो श्वासाप्रमाणे जपणे आवश्यक आहे तोच विश्वास असतो, आणि म्हणूनच त्याला वि-श्वास म्हणत असावे कदाचित... जशी श्वासाची हमी नाही कि तो केव्हा बंद होईल तसेच हल्ली विश्वासाचे झालेले आहे, कोण कधी तुमचा विश्वास तोडेल याचा ही काहीच नेम नाही.
       आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो म्हणजे काय करतो, तर ही व्यक्ती मला कधीच फसवणार नाही, कधी आणि कुठल्याच परिस्थितीत दगा देणार नाही, याची आपल्या मनाशी खुणगाठ बांधून ठेवतो, आपण विश्वास ठेवतो म्हणजे आपण समोरच्याच्या चांगल्या वागण्याची खात्री आपल्या मनाला देत असतो.मानवी मन हे खूप भावनाशील असते, संवेदनशील असते, ते विश्वास ठेवते पण हा जो दाखवलेला विश्वास जेव्हा कुणी मोडतो तेव्हा त्याचा सर्वात जास्त त्रास हा मनाला होत असतो, कारण विश्वास ही भावनिक बाब आहे. मग प्रश्न पडतो की या जगात कुणावर विश्वास ठेवू कि नये, आणि जर ठेवावा तर कितपत?   
      आम्हाला रोज जीवन जगत असतानाही कुणावर आणि कुणावर विश्वास ठेवावाच लागतो, कारण त्याशिवाय आम्ही आमचे दैनंदिन व्यवहार ही करु शकणार नाही. त्यामुळे विश्वास तर ठेवावा लागतो, मग कोण विश्वासपात्र आहे कसे ओळखणार...? असे म्हणतात कि, पानीपत च्या युध्दात “विश्वासराव” गेले तेव्हापासून जगात विश्वास राहिला नाही, आणि ही खरी गोष्ट आहे, विश्वास ही अशी पातळी असते की, तुम्ही अगदी निश्चिंत असता, अगदी डोळे झाकून विसंबून राहता.आणि का न रहावे, प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी अगदी जागरुक, सावधान रहावे असं तर काही नसतं ना, थोडसं रिलॅक्स राहून,समोरचा माझी फसवणूक करणार नाही ही भावना ठेवणे चुकीचे तर नाहीच... किंबहूना ती प्रामाणिक आणि निरोगी भावना आहे. आणि जेव्हा हीच भावना आम्हाला आम्ही ज्याच्यावर विश्वास दाखवला त्याच्याकडून ही मिळते, तो आयुष्यातला सुवर्णक्षण असतो, आणि असे फार कमी क्षण कुणाकुणाच्या वाट्याला येत असतील.
     स्वार्थ हा विश्वास तोडण्यास मोठी भूमिका बजावत असतो, त्यामुळेच प्रत्येकाकडून विश्वास जपण्याची अपेक्षा ठेवणेही चुकीचेच म्हणावे लागेल,कारण प्रत्येकाला आपला स्वार्थ प्रिय आहे आणि याच स्वार्थाने कित्येक मानवी मुल्यांचा बळी घेतला आहे. तिथे विश्वासाची काय कथा...
       या विश्वात विश्वासाने विसावण्यासाठी विश्वास ठेवावा लागतो. विश्वास ठेवावा जरुर ठेवावा, त्यासोबत एक खुणगाठ ही मनाशी जरुर बांधून ठेवावी कि, माझ्या श्वासापेक्षाही माझा या व्यक्तीवर जास्त विश्वास आहे पण तरीही ही व्यक्ती सुध्दा माझा विश्वास तोडू शकते,   कारण ह्या व्यक्तीलाही काही स्वार्थ आहे, ती व्यक्ती सुद्धा एक माणूस आहे. आणि माणसाचा काही भरवसा नाही.
       तुम्ही जेव्हा या जगाचा निरोप घ्याल तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या अशा व्यक्तीची संख्या मोजा, ज्यांनी तुम्ही त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला, ती संख्या जेवढी जास्त असेल तेव्हढे तुम्ही भाग्यवान असाल...!
© राजेश खाकरे
Mo.7875438494

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...