फोटो उगीचच कुणाचा

नको टाकू मित्रा, फोटो उगीचच कुणाचा
वरच्या ओळी वाचुस्तोवर धडधड काळजात होते
© राजेश खाकरे

कदाचित देवा..!

कदाचित देवा..!
काल परवा-परवा पर्यंत जिवंत असलेल्या व्यक्तीला
आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना थरकाप होतोय काळजाचा
भीती मरणाची नाही वाटत. भीती वाटते ते मरण ज्या पद्धतीने येत आहे त्याची.
जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे हे ऐकत आलो होतो,
पण तो उद्या, परवा केव्हाही जाऊ शकतो, हे खूपच भयंकर आहे ना..!
गेल्या दीड वर्षांपासून तोंड बांधून बांधून आणि हाताला फवारे मारून मारून पार कंटाळा आलाय देवा,
जगण्यात मौज नाही राहिली, जगणं भीतीच्या सावटाखाली पार दबून गेलंय..!
कोणाची ऑक्सिजन लेव्हल किती ठेवायची आणि कोणाचा स्कोअर कसा असावा, याचा हिशोब तुझ्याकडेच होता देवा;
तो आमच्याकडे नकोच देऊ..!
चूक तुझी नाहीच देवा, चुका आमच्याच...
ताजातवाना ऑक्सिजन देणारी झाडे आम्ही कराकरा कापून टाकली... आणि उभारत गेलोय सिमेंटची जंगलं..!
तू माणूस म्हणून आम्हाला जन्माला घातलं आणि आमच्यात थोडी माणुसकी ओतलीस..
पण देवा त्या माणुसकीची वाफ होऊन उडून गेली आता..!
आता आम्ही नुसती माणसे आहोत... भेसळयुक्त माणसे... आम्ही आता शुद्ध नाहीतच... सगळ्यात भेसळ केली...करतो आम्ही...
तू बघितलं असेलच परवा-परवा आम्ही इंजेक्शनातही काळाबाजारी केली.. आम्ही कुणालाच आणि कशालाच सोडत नाही.
म्हणूनच कदाचित तू आमच्यावर रागावला असावा...! तुला वाटलं माणसे सुधारतील..! पण माणसे सुधारणार नाहीत देवा...!
पण देवा, तू तर देव आहेस ना, आमच्यावर रागव, आम्हांला अद्दल घडव, पण आता हे थांबव आणि आम्हांला मोकळा श्वास घेऊ दे! एक संधी पुन्हा दे, कदाचित आम्ही माणुसकी रुजवण्याचा प्रयत्न करू! कदाचित आम्ही ही वसुंधरा जपण्याचा प्रयत्न करू!!!
© राजेश खाकरे
मो.7875438494

निंदक नियरो राखियो...

आपण धोब्याची पर्वा करायची नाही. धोबी म्हणजे जातीचा धोबी नाही तर धुणारा. श्रीरामाने धोब्याची पर्वा केली आणि पुढे काय झाले आपल्याला माहितच आहे. हा धोबी प्रतिकात्मक आहे. आपण धुणाऱ्याला त्याचे काम करू द्यायचे. आणि तो आपल्याला स्वच्छ करतो म्हणून मनातल्या मनात त्याचे आभार मानायचे! कबीरदासांनी म्हटलेच आहे "निंदक नियरो राखियो..."
©राजेश खाकरे
१७ मार्च २०२१
#सूर्योदय

दोन ओळी

घाबरला तो, हातून त्याच्या दुष्कर्म घडता;
सामान्य वाटला, बहुदा तो मंत्री नसावा!
© राजेश खाकरे

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...