चारोळ्या-बिरोळ्या:३१

चारोळ्या-बिरोळ्या-३१
हल्ली खूप विचित्र वाटते
काय झाले समजत नाही
वातावरण दूषित झाले की मी
काही काही कळत नाही
●●●

तशी घटना घडली
सर्वानी डीपी बदलला
मनातील काळिमा
तसाच मनात ठेवला
●●●

तशा घटनेत मीडियाने
धर्माचा री ओढला
तेव्हा वाटले लोकशाहीचा
चौथा स्तंभ किडला
●●●

तशा घटनेत त्यांनी
धर्म मध्ये आणला
करणारा आणि बोलणारा
मला सारखाच भासला
●●●
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

"सल" "मना"तली

"सल" "मना"तली

हे काळ्या हरणा,
तुला कोणी सांगितले होते
त्या मध्यरात्री घनदाट जंगलात
"सलमान"च्या समोर जायला,
नामशेष व्हायला..!
तुला माहीत नसेल कदाचित,
तू नामशेष होणाऱ्या प्रजातीमधला आहेस म्हणून
गेलास ना जीवानिशी..!

आणि आज २० वर्षानंतरही त्या
बिचाऱ्याला का छळतो आहेस...!
काय मिळाले तुला एवढे करून..!

किती किती नुकसान झाले तुला
नसेल माहीत!
कालपासून त्या टीव्हीवरच्या बिचाऱ्या
अँकरांना किती चिंता लागून राहिली आहे...
बेल मिळेल की नाही म्हणून...?
घसा कोरडा पडला आहे ना त्यांचा चर्चा करून करून...
बिचाऱ्यांनी आत कॅमेरा नेण्याची परवानगी नसतानाही किती हुबेहूब वर्णन करून सांगितले आम्हांला आतले सर्वकाही..

निदान उद्यातरी बेल मिळावी बाबा
टायगर तुला,
नाहीतर परत अन्याय बिन्याय
होऊन जायचा निरपराध माणसावर...

काल म्हणे तुला झोप नाही आली रात्रभर,
तू काय खाल्लेस, काय नाही खाल्लेस,
कुठले कपडे घालायला नकार दिला
एकनएक बातमी कळवली भाऊ मीडियाने आम्हाला..!
म्हणजे काय..? महत्वाची एक पण बातमी सोडत नाहीत,
आपल्या इथले न्यूजवाले...!

आमच्या इथे गुन्हेगार फक्त एक गुन्हेगार नसतो काही..!
त्याला खूप लेबलं असतात...
तो प्रसिद्ध असतो,
पैसेवाला असतो,
कधी सत्तेवाला असतो,
कधी त्याला जात धर्म असतो
त्याला फॅन्स असतात, अनुयायी असतात,
आणि त्यानुसार मग त्याला स(ल)मानतेची
वागणूक मिळते.
एखाद्या गरीब माणसाच्या "मना"त एक "सल" मात्र कायम  राहते. ही स(ल)मानतेची वागणूक बघून...!
■ राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com


आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...