चारोळ्या-बिरोळ्या:३१

चारोळ्या-बिरोळ्या-३१
हल्ली खूप विचित्र वाटते
काय झाले समजत नाही
वातावरण दूषित झाले की मी
काही काही कळत नाही
●●●

तशी घटना घडली
सर्वानी डीपी बदलला
मनातील काळिमा
तसाच मनात ठेवला
●●●

तशा घटनेत मीडियाने
धर्माचा री ओढला
तेव्हा वाटले लोकशाहीचा
चौथा स्तंभ किडला
●●●

तशा घटनेत त्यांनी
धर्म मध्ये आणला
करणारा आणि बोलणारा
मला सारखाच भासला
●●●
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...