कोरोना: वाहक बनणे नाही

वाहक बनणे नाही

जर तुम्ही का अंतर-बिंतर पाळले नाही
कळले सारे परी तुम्हांस ते वळले नाही
कर्मचारी गेले कितीदा सांगून तुम्हांला
गांभीर्याने तुम्ही कधी ते ऐकले नाही

लक्षात ठेवा वेळ आता नेहमीची नाही
चुकीला तुमच्या यावेळी माफीच नाही
कोरोना येता नेईल तो कान पकडूनि
धोका मोठा अजून तुम्हांस कळला नाही

कोरोनाचे संकट जरी हे सोपे नाही
काळजी घेता इतकेही ते मोठे नाही
लढू शकतो आपण सगळे निर्धाराने
कोरोनाला वाहक आपण बनणे नाही
-राजेश खाकरे


कविता: चालत आलो वाट

चालत आलो वाट कुठेही वळली नाही
तिच्या मनातील गुपिते कधीच कळली नाही

तुझ्यासारखा नाही कुणी, ती मला म्हणाली
हसलो नुसता,अजून इथे तू रुळली नाही

ठिगळे लावून केली आईने रोजंदारी
रुतला काटा जखम तिची भळभळली नाही

रात्र वाढता पांगून गेल्या सर्व चांदण्या
ध्रुवताऱ्याची जागा कधीच ढळली नाही

कशास दोष द्यावा नुसत्या सुगंधाला
हवी तितकी फुले अजून फुलली नाही

दिसतो मनाचा तळ कधीतरी खोलवर
वाटते तितकी जिंदगी आपली मळली नाही
© राजेश खाकरे, मो.७८७५४३८४९४
दिनांक: १६/१२/२०१९

भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली

इथल्या राजकारणाला
राजकारणातल्या निष्ठेला
सत्तेच्या लालसेला
भावपूर्ण श्रद्धांजली..!

इथल्या चढाओढीला
खुर्ची ओढाओढीला
त्यांच्या फोडाफोडीला
भावपूर्ण श्रद्धांजली..!

जनतेच्या मताला
बहुमताच्या भुताला
त्यासाठीच्या गणगोताला
भावपूर्ण श्रद्धांजली..!

विकासाच्या वाटेला
प्रगतीच्या भेटीला
अंगठ्या जवळच्या बोटाला
भावपूर्ण श्रद्धांजली..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
२४ नोव्हेंबर २०१९

हे नाराज आहेत, ते नाराज आहेत!

हे नाराज आहेत, ते नाराज आहेत,
फक्त जनता नाराज नाही होत कधीच!
ती सज्ज आहे हातात फुलांचा हार घेऊन
कुणाच्या गळ्यात घालायचा म्हणून!
पण अजून लोकांना कळलच नाही
कोणत्या उमेदवारापुढे कोणतं चिन्ह आहे म्हणून!

पक्ष बिक्ष या सगळ्या अंधश्रद्धा उरल्यात आता.
तिकीट देणारा पक्षच आपला खरा पक्ष असतो;
हे कळलंय आता त्यांना, त्यांना उगीच बंडखोर म्हणून
हिणवू नका!

निष्ठावंत वगैरे काही नसतं कधी. फक्त असतं ते 'निसटा-वंत'
एक उपरणे खिशात ठेवणाऱ्याचा जमाना नाही ऱ्हायला आता!

काल एकाने विचारलं, "ते प्रचार कधी चालू होणार आहे?"
"का बरं?" मी उत्सुकतेने विचारलं!
"दुसरं काही नाही, दहा बारा दिवस मजेत जातात!"
"तू कुठल्या पार्टीचा आहेस का?"
"नाही भाऊ, मी फक्त पार्टीचा आहे!"
"अजून वेळ आहे!"
"कशाला?" त्याचा प्रतिप्रश्न..
"सगळं काही सुरू व्हायला!"  मी काय सांगणार दुसरं!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४


प्रेम आणि मैत्रीचे भांडण


प्रेम आणि मैत्रीचे भांडण
●●●
प्रेमाचा आणि मैत्रीचा सुरू जाहला झगडा
तुझ्या न माझ्यामध्ये म्हणे कोण आहे तगडा

दोन जीवाची प्रीत माझी जगात आहे नांदते
प्रेमानेच दोन मनांची जवळीक म्हणे साधते

प्रेम असते हवा गुलाबी प्रेम असते अत्तर
जीवनात प्रेमापेक्षा सांगा काय बेहत्तर?

प्रेमासाठी वाट्टेल ते करण्या माणूस धजतो
म्हणूनच प्रेम म्हणाले, मीच मोठा ठरतो

हसून म्हणाली मैत्री, खरेच आहे मित्रा
तुझ्याशिवाय फुलत नाही जीवनाची जत्रा

कटू आहे पण सत्य सांगतो, तुला तुझी महती
तुझ्यामुळेच दररोज ती, कितीक ह्रदये तुटती

भंगलेले ह्र्दय ते मग माझ्याच दारी येते
मित्रांकडे मैत्रीचा आश्वासक हात मागते

मैत्री घालते हळूच फुंकर, ह्रदयाशी कुरवाळते
काळजी नको करुस मित्रा! मी आहे ना म्हणते

मैत्री नसते सिजनेबल, नसते स्वार्थापुरती
लंगोटी घातल्यापासून सोबत करते मैत्री

सगळे जातील सोडून, दिवस पालटताना
मैत्रीचा दीप तुला दिसेल सोबत जळताना

मैत्रीला ना जात असते, ना लहान मोठेपणा
मित्रांशिवाय कुठे असतो, अर्थ ह्या जीवना?

प्रेमाचा अन मैत्रीचा मिटेना काही तंटा
दोघांनी वाजवली "विश्वासा" च्या दाराची घंटा

दोघांचाही एकच प्रश्न म्हणाले 'उत्तर सांगा?'
प्रेमाने की मैत्रीने, जास्त कुणी दिला दगा?'

दुखावलेल्या भावना घेऊन 'विश्वास' बाहेर आला
प्रेमा तुझा नाही भरवसा मैत्रीने डाव जिंकला
© राजेश खाकरे
मैत्री दिन, दिनांक: ४ ऑगस्ट २०१९

प्रेम आणि मैत्रीचे भांडण


प्रेम आणि मैत्रीचे भांडण
●●●
प्रेमाचा आणि मैत्रीचा सुरू जाहला झगडा
तुझ्या न माझ्यामध्ये म्हणे कोण आहे तगडा

दोन जीवाची प्रीत माझी जगात आहे नांदते
प्रेमानेच दोन मनांची जवळीक म्हणे साधते

प्रेम असते हवा गुलाबी प्रेम असते अत्तर
जीवनात प्रेमापेक्षा सांगा काय बेहत्तर?

प्रेमासाठी वाट्टेल ते करण्या माणूस धजतो
म्हणूनच प्रेम म्हणाले, मीच मोठा ठरतो

हसून म्हणाली मैत्री, खरेच आहे मित्रा
तुझ्याशिवाय फुलत नाही जीवनाची जत्रा

कटू आहे पण सत्य सांगतो, तुला तुझी महती
तुझ्यामुळेच दररोज ती, कितीक ह्रदये तुटती

भंगलेले ह्र्दय ते मग माझ्याच दारी येते
मित्रांकडे मैत्रीचा आश्वासक हात मागते

मैत्री घालते हळूच फुंकर, ह्रदयाशी कुरवाळते
काळजी नको करुस मित्रा! मी आहे ना म्हणते

मैत्री नसते सिजनेबल, नसते स्वार्थापुरती
लंगोटी घातल्यापासून सोबत करते मैत्री

सगळे जातील सोडून, दिवस पालटताना
मैत्रीचा दीप तुला दिसेल सोबत जळताना

मैत्रीला ना जात असते, ना लहान मोठेपणा
मित्रांशिवाय कुठे असतो, अर्थ ह्या जीवना?

प्रेमाचा अन मैत्रीचा मिटेना काही तंटा
दोघांनी वाजवली "विश्वासा" च्या दाराची घंटा

दोघांचाही एकच प्रश्न म्हणाले 'उत्तर सांगा?'
प्रेमाने की मैत्रीने, जास्त कुणी दिला दगा?'

दुखावलेल्या भावना घेऊन 'विश्वास' बाहेर आला
प्रेमा तुझा नाही भरवसा मैत्रीने डाव जिंकला
© राजेश खाकरे
मैत्री दिन, दिनांक: ४ ऑगस्ट २०१९

लव्ह यु कविते, लव्ह यु जिंदगी

लव्ह यु कविते..लव्ह यु जिंदगी..!
●●●
आज एका मित्राने सहज विचारलं, "एवढ्या व्यापात कविता कशी सुचते?"
मी नुसतं स्मितहास्य केलं.
खरं तर कविता सुचायला व्यापच लागतो. मनात एक अस्वस्थता निर्माण व्हावी लागते. उन्हाच्या काहिलीसारखी तगमग झाली की कविता बाहेर येते. चरख्यात ऊस पिळवटून निघाल्यावर रस बाहेर यावा, तसे कळत नकळत मन पिळून, पोळून निघाले की कविता अवतरते. बोलतांना, सांगतांना शब्दांना मर्यादा येतात. आपली भावना समोरच्याला सांगतांना ती त्यांच्यापर्यंत हवी तशी पोहचतेच असे नाही. किंबहूना बरेच बोलूनही मनात खूप काही मागेच राहून जाते. शब्द फाफटपसारा निर्माण करतात. कवितेचे तसे नसते. ती बाहेर येते तीच परिपूर्ण होऊन. अगदी कमी शब्दांत खूप काही पोहचवते समोरच्यापर्यंत. कविता अनेक पैलूंनी पोहचते सगळ्यांपर्यंत. कविता भावनेत ओथंबून निघते. तिला कायदे कानून समजत नाही. कवितेला युक्तिवाद समजत नाही, तिला मनाचा सच्चेपणा समजतो. भावनेचा ओलावा समजतो. म्हणून कविता वाचल्यावर काही क्षण माणूस शांत होतो. स्वतः च्या आत डोकावतो. त्याला एक तृप्ततेची अनुभूती येते.
कविता शब्दांची ओळ नसते. ती एक अभिव्यक्ती असते. कवितेला जन्म देऊन कवी मातृत्व प्राप्तीची अनुभूती घेत असतो. ती अनुभूती अवर्णनीय असते. कारण कविता जन्मण्यापूर्वी कवीने प्रसववेदना सहन केलेल्या असतात. त्या कराव्याच लागतात. त्याशिवाय मजाच नाही. कवितेचे सीझर करता येत नाही. तिला प्रसवूच द्यावी लागते नैसर्गिकपणे; त्याशिवाय कवित्वच नाही.
कुणी चांगले म्हणेल म्हणून आई मुलाला जन्म देत नाही, तिला आनंद वाटतो म्हणून ती मुलाला जन्म देते. कवितेचेही तसेच, कविता कुणाला आवडेल म्हणून कवी कविता लिहीत नाही, तो त्याच्या आनंदासाठी लिहितो. हा आनंदाचा मार्ग आहे.
लुच्चेगिरीने भरलेल्या या जगातून कधी दमून भागून मनाच्या पायथ्याशी बसलं की, कविता तिच्या कोमल हातांनी अंतःकरणाला अलगद स्पर्श करते आणि आतला सगळा कचरा झाडून पुसून दूर होतो.  एखाद्या पाऊस पडून गेल्यानंतर स्वच्छ झालेल्या रस्त्याप्रमाणे मन स्वच्छ होते. सगळ्या भावभावना उचंबळून बाहेर येऊ बघतात. संघर्षाच्या विजा कडकडू लागतात. धो-धो कोसळणाऱ्या पावसाप्रमाणे मन बरसू लागते आणि त्याची एक सुंदर कविता होते. सगळं कसं प्रसन्न प्रसन्न होतं, पाऊस पडून गेल्यासारखं..
लव्ह यु कविते...लव्ह यु जिंदगी..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...