छकुलीचे पत्र

                         !! श्री !!
तीर्थरूप/प्रिय ------------------
मामा/मामी,मावशी/काका,आत्या,आई/बाबा,दादा,ताई
स.न.वि.वि.
      पत्र लिहण्यास कारण की, बरेच दिवस झालेत माझ्या मनातली एक गोष्ट आपणास सांगावयाची आहे; परंतु संकोच वाटायचा की सांगू की नको...? तुम्ही मानाल की नाही हा ही प्रश्न मनात यायचा. आज वाटले की सांगून टाकावे म्हणून हे पत्र लिहायला घेतलं.
     मला महितेय की तुमचे माझ्यावर खुप प्रेम आहे आणि त्याचमुळे तुम्ही मला हवी ती गोष्ट लगेच आणून देता, मात्र आज मी आपल्याकडे अशी गोष्ट मागणार आहे, जी अवघड गोष्ट तर नक्कीच नाही; पण आजपर्यंत तुम्ही ती करू शकला नाहीत. तुमच्या घरी कलर टीव्ही आहे, फ्रिज आहे, मोटरसायकल आहे, तुमची समाजात एक चांगली प्रतिष्ठा आहे. पण तरीही मी जेव्हा कधी तुमच्या घरी येते तेव्हा मला शौचास उघड्यावर जावे लागते, मला ते आवडत नाही, ते लाजिरवाणे वाटते तरीही मला नाइलाजाने जावे लागते, नुसते मलाच नाही तर माझी आई/काकी/मामी/आजी/मावशी/बहिण या सर्वाना जावे लागते,
      मी असं ऐकलं आहे की सरकारने स्वच्छ भारत मिशन नावाची योजना आणली आहे;ज्यात जर आपण आपल्या घरी शौचालय बांधले तर सरकार १२०००/- रु देते. तुम्ही मला नेहमी सांगायचात की  "आम्ही शिकलो नाहीत मात्र तू चांगली शिक आणि खुप मोठी हो..!" तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमाने मी आजपर्यन्त शिकत आहे, मला आता हे कळायला लागलं की, कितीतरी रोगराई ही उघड्यावर शौचास केल्याने व् घाण केल्याने वाढते, मी एक दिवस मोठी होईलच मात्र मला आता असं ही वाटायला लागलं की माणसाला मोठं व्हायचं असेल तर त्याच्या घरी आधी शौचालय असले पाहिजे.
         मी आज तुम्हाला विनंती करते की, प्लीज माझ्यासाठी तुमच्याघरी एक शौचालय बांधाल का...? मी जेव्हा दिवाळीच्या सुट्टीत तुमच्याकडे येईल ना..तेव्हा फक्त एक गोष्ट करा, मी सकाळी जेव्हा झोपेतुन उठेल ना, तेव्हा तुम्ही तुमचे एक बोट समोर करा आणि मला सांगा की, "छकुली, ते बघ तुझ्यासाठी शौचालय बांधले बघ मी..!"
मला जगातले सर्वात मोठे बक्षिस मिळालेले असेल.
             - तुमची -छकुली
लेखक:- राजेश खाकरे मो.7875438494
(ता.क.:- स्वच्छ भारत मिशन आणि शौचालय अनुदानासाठी तुमच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा)

हे मजबुरी

हे मजबुरी, तुझे मैं सलाम करता हू
तेरे सामने मेरी ख़ुशी कलम करता हू

जख्म देती हैं तू हर पल इतने गहरे
बहता रहता हैं खून,ना मैं मलम करता हू

कितनी सिद्दत से निभाऊ फर्जं मैं अपने
आँखोंसे गिरते है आंसू सहन करता हू

एक अर्से के बाद तुझे बदलना जरुर होगा
यही सोचकर हर दुःख को मैं नमन करता हू

ना मैं खुश हू ना नाराज हूं मैं तुझसे
तेरे हर एक फैसले का स्वागत करता हू

किसी दिन हो ना जाए तेरे भी आँखे नम
इसलिए मेरे अश्क पलको में छुपाया करता हू
-राजेश खाकरे
मो.7875438494

अस्तित्व...



अस्तित्व

ओल्या शेतात धान्याची पेरणी करताना
हुरडा झालेल्या कणसाची कापणी करताना
मातीमोल भावाने पिकाची विक्री बघताना
हातावर उमटलेल्या प्रत्येक चरबटावर
शेतकरी शोधत राहतो स्वतः चं अस्तित्व दरवर्षी...

या भल्यामोठ्या जगात वावरतांना
मान-अपमान खाचखळगे पचवतांता
सुख-दुःखाची गोळाबेरीज करतांना
उगवणाऱ्या सूर्याच्या प्रत्येक किरणांवर
माणूस शोधत राहतो स्वतः चे अस्तित्व दरदिवशी

आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन सर्वांसमोर मांडताना
पद प्रतिष्ठा पैसा यात गुरफटून जात असतांना
दुसरीकडे गरीब पोटाची टीचभर खळगी भरतांना
शर्टावरील ठिगळात शोधत राहतो
त्याच्या मुलाच्या भविष्याचे अस्तित्व दरवेळी

प्रत्येकजण लढतोय स्वतःच्या अस्तित्वाची लढाई
मोठा, श्रेष्ठ , पैसेवाला बनण्यासाठी चालू आहे चढाई
विश्वास-अविश्वास, प्रेम-द्वेषाच्या बहुरंगी वातावरणात
मी शोधत राहतो माणुसकीचे अस्तित्व सभोवताली प्रत्येकवेळी
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

बालकविता : पशु-पक्षांचे संमेलन



बालकविता : पशु-पक्षांचे संमेलन

पशु आणि पक्षांचे संमेलन जंगलात भरले
कोल्होबाने कष्ट घेऊन आयोजन त्याचे केले

जंगलाचे राजे सिंहोबा अध्यक्षस्थानी बसले
पांढरीशुभ्र खादी घालून बगळोबा आले
खारु ताई, माकडदादा,ससेराव ही आले
हळूहळू येता येता कासवराव लेट झाले

कोकिळीने मंजुळ स्वरात गाणे मधुर गायले
मोरांचे नाचणं बघून सारे मंत्रमुग्ध झाले
पोपटाने थट्टामस्करीत मिमिक्री जरा केली
हत्तीने मग साहित्यावर गंभीर चर्चा केली

खारुताईने योगाचे प्रकार करुन दाखवले
माकडदादाने सर्व नुसते पाहणे पसंद केले
बगळोबा चष्मा सावरत स्टेजवरती आले
राजकारणावर ते लांबलचक बोलून गेले

वाघोबाराजे, सिंहोबाचे जोरदार भाषण झाले
जंगलावर माणसाचे आक्रमण होतेय म्हणाले
कावळोबाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
शेवटी जेवणावर सर्व मनसोक्त तुटून पडले
©  राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com


फक्त एकच प्रॉब्लेम आहे...


फक्त एकच प्रॉब्लेम आहे...

        या जगातील गमतीची गोष्ट काय आहे माहितेका....या जगातल्या प्रत्येकाला एक प्रॉब्लेम आहे, जो त्याला दुःखी करत असतो....तुम्हाला कधी वेळ मिळाला ना तर एक काम नक्की करा ज्याला तुम्ही सुखी मानता ना त्याला जाऊन भेटा, चांगल्या तासभर गप्पा मारा, बोलता बोलता तो म्हणेल, "काय सांगू तुम्हाला, सर्व व्यवस्थित आहे हो देवाच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने, पण फक्त "हा" एक प्रॉब्लेम आहे नाहीतर, माझ्यासारखा सुखी कोणी या जगात नसता"
         आणि मग त्या प्रॉब्लेम चे चांगले लांबलचक रडगाणे तुमच्यासमोर गाणार.. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला भेटा त्याला एक असा प्रॉब्लेम नक्की आहे जो त्याला सुखाने जगू देत नाही, आता ह्या प्रॉब्लेम ची काही ठराविक साईज नाही मात्र तो मोठा प्रॉब्लेम आहे असेच प्रत्येकाला वाटत असते, कुणाला कशाचा प्रॉब्लेम असेल याचाही काही नेम नाही, कुणाला पैसे नाही हा प्रॉब्लेम असेल तर कुणाला पैसे कसे सांभाळायचे हा प्रॉब्लेम असेल, कुणाला मुलगा नाही हा प्रॉब्लेम आहे तर कुणाला जास्त आहेत हा प्रॉब्लेम, कुणाची एखादी इच्छा सफळ संपूर्ण होत नाही म्हणून दुःखी असेल, तर कुणी कशामुळे.
         मला तर हा भगवंत मोठा कलाकार वाटतो, तो आमची गंमत कुठे तरी गुपचूप बसून बघत असावा, की बघू आता हा काय करतो, कधी तर असं वाटतं की त्या देवाला जणू कुणाला सुखाने जगू द्यायचे नसावे, कारण त्यांनी कुणाच्या बापाला सोडलेले नाही, पैसेवाला सुखी असेल असे समजून आम्ही जेव्हा पैशावाल्यांच्या जीवनाकडे बघतो तर त्यांचे तर वेगळेच प्रॉब्लेम आम्हाला दिसतात , त्यांना अन्न पचवायला रोज फिरत बसावे लागते (हा पण एक मोठा प्रोब्लेमच आहे)
         "मी 100% सुखी आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही" असे छातीठोकपणे म्हणणारा मला तरी अजून कोणी भेटला नाही. म्हणजे प्रत्येक जण आपल्या "गन-गणीत" आहे, आणि हि गनगण (प्रॉब्लेम) काही आयुष्यभर सुटत नाही, कारण एक प्रॉब्लेम सुटला कि दुसरा हजर असतो,
        खरं तर काय आहे, काही प्रॉब्लेम हे मुळात प्रॉब्लेम नसतातच फक्त आपण त्याच्याकडे त्या नजरेने बघायला हवे, प्रॉब्लेम आम्हांला खरं तर मजबूत बनवतो, आम्हांला सशक्त बनवतो, आम्हांला लढायला शिकवतो, आपल्या-परक्याची जाणीव करुन देतो, प्रॉब्लेम मध्ये आम्ही जगाकडे एका       वेगळ्या नजरेने बघायला शिकतो,
       बहुतांशी प्रॉब्लेम, समस्या या मानसिक असतात, प्रॉब्लेम काही आमच्या अंगावर रोड रोलरप्रमाणे धावून येत नाही, तरीही आम्ही घाबरून जातो, खचून जातो, आता काय होईल या विवंचनेत राहतो,
हे जग ज्या ईश्वराने निर्माण केलंय तो काही मूर्ख तर नाहीच, तो प्रॉब्लेम हि आमच्या भल्यासाठीच देत असणार, नाहीतर त्याची आणि आमची काही पुरानी दुष्मनी तर नक्कीच नाही, कुंतीमातेने ईश्वराला म्हटले की "देवा मला दुःख दे, कारण दुःखात मला तुम्ही आठ्वता, मला शक्ती मिळते."
आमच्यात एवढी हिंमत तर नाही तसे काही म्हणायची पण आम्ही दुःखाला, प्रॉब्लेम ला एवढं म्हणू शकतो, की हे दुःखा तू ये, तुझे स्वागत आहे, तू माझ्याकडे आला आहेस याचा अर्थ हाच कि भगवंत नक्कीच माझ्यासाठी काही छान घडवत आहे…!”
     आणि हा दृष्टिकोन ठेऊन आम्ही जर प्रॉब्लेम ला सामोरे गेलो तर प्रॉब्लेम आम्हांला चावणार नाही, आणि मग आम्ही म्हणू शकू, "माझ्या आयुष्यात ही एक प्रॉब्लेम आहे, पण तो प्रॉब्लेम माझे आयुष्य अस्वस्थ करत नाही, प्रॉब्लेम काय आहे माहितेका दुःख आता मला पहिल्यासारखी चावत नाही...!
© राजेश खाकरे
Mo 7875438494
rajesh.khakre@gmail.com

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...