लायकी...


लायकी...

माणसाची लायकी नसते त्याच्या जवळच्या पैशावर अवलंबून
नसते तो किती दादागिरी करु शकतो त्यावर
माणसाची लायकी समजते त्याच्या वागणुकीवरुन
तो किती प्रामाणिक आहे नीतिमत्तेशी,
तो स्वार्थासाठी कोणत्या थराला जातो यावरुन.
तो वास्तव नाकारून त्याच्या स्वत्वाचा बळी तर देत नाही ना यावरुन.
स्वतः चा स्वार्थ तर पशुनांही समजतो. पण माणूस म्हणजे पशु नाही.सत्य हे चिरंतन शाश्वत असते.सत्यावर क्षणभर निर्लज्जपनाचा पडदा टाकताही येईल कदाचित; पण म्हणून सत्य झाकाळले असे नाही म्हणता येत.
जग तुमच्या कृतिचा त्यांना अनुकूल असा अर्थ लावत असते.परंतु तुमची कृति योग्य की अयोग्य हे मात्र दोन लोकानांच माहीत एक आपण स्वतः अन दुसरा तो सर्वसाक्षी चिरंतन भगवंत!
माणसाने त्याची लायकी सोडावी की धरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न;परंतु त्याने परिणामासाठी मात्र सदैव तयार असले पाहिजे! हे परिणाम त्याला भोगावे मात्र नक्की लागणार! भगवंताचे एक न्यायालय या सृष्टीत काम करते.त्याला तुम्ही नियती म्हणा, नशीब म्हणा,ते मात्र कुणाला कधीच क्षमा करत नाही. आणि येथे कुठल्या साक्षी पुराव्याची गरज नसते.नियती लाच घेत नाही.तुमची घसेओरड करायची तेथे गरज नसते.मात्र तिथला न्याय म्हणजे न्याय असतो.तिथे कुठले अपील नसते. कुठला फेरविचार नसतो.मात्र जे काही असते ती भगवंताची अतिशय उत्कृष्ट अशी न्यायिक व्यवस्था असते.
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...